चंद्रपूर:- चंद्रपूर येथे एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाला बारा वर्ष झाल्यानंतरही तरुणाच्या घरी पाळणा हलला नव्हता. याबद्दल पत्नी त्यालाच दोष देत होती. एके दिवशी अचानक तरुणाची पत्नी कोणालाही न सांगताच घरातून निघून गेली होती. ती दुसऱ्या पुरुषाशी लग्नही करणार होती. या प्रकारामुळे पती नाराज झाला आणि त्याने आपला जीव दिल्याचा आरोप केला जातो.
चंद्रपूर: लग्नाच्या १२ वर्षांनंतरही पाळणा हलला नाही, पतीची आत्महत्या तर पत्नी दुसऱ्या लग्नाच्या तयारीत! | Batmi Express
चंद्रपूर:- चंद्रपूर येथे एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाला बारा वर्ष झाल्यानंतरही तरुणाच्या घरी पाळणा हलला नव्हता. याबद्दल पत्नी त्यालाच दोष देत होती. एके दिवशी अचानक तरुणाची पत्नी कोणालाही न सांगताच घरातून निघून गेली होती. ती दुसऱ्या पुरुषाशी लग्नही करणार होती. या प्रकारामुळे पती नाराज झाला आणि त्याने आपला जीव दिल्याचा आरोप केला जातो.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.