भंडारा: गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam) धरणामधुन आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रणाकरिता धरणातून 483 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. आज दिनांक 03/07/2026 रोजी रात्री 08:00 वाजता वाढवून 1,343 क्युमेक्स करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा येवा (Inflow) पाहता या विसर्गात टप्प्या-टप्प्याने आणखी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती बातमी एक्सप्रेसला धरण प्रशासन कडून देण्यात आली आहे.
नोट : बातमी लेखनात बदल चालूच राहणार - वाचकांनी AI चा वापर सुद्धा करांव. : क्लिक मी
सूचना : आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे.
प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन बातमी एक्सप्रेस टीम सर्व जिल्ह्यातील वाचकान करीत आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.