भंडारा: गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam) धरणामधुन आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रणाकरिता धरणाचे 17 दरवाजे उघण्यात आली असून त्यातून 2 हजार क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तसेच धापेवाडा येथील विसर्ग सुरू असून त्यामुळे येत्या काही तासात गोसीखुर्द प्रकल्पाच्या विसर्ग मध्ये पुनः 4 हजार 500 क्युमेक्स पर्यंत वाढ करण्यात येणार असलयाची माहिती बातमी एक्सप्रेसला धरण प्रशासन कडून देण्यात आली आहे.
नोट : बातमी लेखनात बदल चालूच राहणार - वाचकांनी AI चा वापर सुद्धा करांव. : क्लिक मी
सूचना : सध्या गोसीखुर्द चे 17 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली. आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन बातमी एक्सप्रेस टीम सर्व जिल्ह्यातील वाचकान करीत आहे.