Breaking! नक्षल्यांनी केली एका व्यक्तीची हत्या | Batmi Express

Be
0

Aheri,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Naxal,Naxal,Naxal Live,Naxal Updates,Naxal Today,

अहेरीपोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका व्यक्तीची हत्या केली. अहेरी तालुक्यातील ताडगाव-दामरंचा रस्त्यावर काल पहाटे ही घटना उघडकीस आली. अशोक तलांडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ताडगावपासून पाच किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर अशोक तलांडेचा मृतदेह आढळून आला.

घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकले असून, अशोक तलांडे पोलिसांचा खबऱ्‍या असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. अशोक तलांडे हा मागील काही दिवसांपासून ताडगाव येथे वास्तव्य करीत होता. मोलमजुरी करुन तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र, नक्षल्यांनी  त्याची हत्या केली. दरम्यान, अशोक हा पोलिसांचा खबऱ्या नव्हता, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. 

Also Read:आरमोरी: चारीत्र्याच्या संशय.... जन्मदात्या वडीलाने स्वतःचा मुलगा व मुलीवर कुर्‍हाडीने वार

मागील आठवड्यात गडचिरोली पोलिसांनी ४ नक्षल्यांना ठार केले होते. त्यामुळे नक्षल्यांनी पोलिस खबरे असल्याच्या संशयावरुन सामान्य नागरिकांना लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणूक सुरु असताना ही हत्या झाल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->