बातमी वृत्तसेवा गडचिरोली
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सतत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हयातील पुरस्थितीवर उचित नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायायोजने अंतर्गत 11 जुलै ते 13 जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवा, अस्थापना वगळता शाळा, महाविद्यालय व इतर सर्व बाबी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले होते.
Read Also:
- गडचिरोली रेड अलर्ट! गडचिरोलीत मुसळधार पाऊस, 130 गावांचा संपर्क तुटला
- गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ : सिरोंचा तालुक्यातील 12 गावे ताबडतोब खाली करण्याचे निर्देश
मात्र गडचिरोली जिल्हयातील सध्यास्थितीची पुरपरिस्थिती बाब लक्षात घेता वरील आदेशात नमूद केलेल्या कालावधीत 16 जुलै 2022 पर्यंत पुन्हा वाढ करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी कळविले आहे.