तरुण शेतकऱ्यांची गळफास लावून केली आत्महत्या
जनकापूर रिठ येथील शेतकरी श्री किशोर हरबाजी धुर्वे, वय 45 वर्ष, 2017 पूर्वीचा कर्ज 1.00 लक्ष रुपये होता तो माफ झाला नाही, शेतीत धान आणि बारमाही भाजीपाला लागवड करायचं डिसेंबर 21 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने कापणी झालेले 4 एकरती धान पीक नष्ट झाली याचा मोठं धक्का त्याला बसला, त्यातून सावरत नाही, पुन्हा जानेवारी महिन्यात गारपिटीने 1 एकरातील सम्पूर्ण रब्बी, फळबाग , भाजीपाला अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाले. त्या शेतकऱ्याला मोठा धक्का बसला त्यामुळे त्याने स्वतः च्या शेतात आज सकाळी 7 वा चे दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली त्याच्या मागे 2 मुली, पत्नी, म्हातारी आई, भाउ इतका परिवार आहे. ( Young farmers commit suicide by hanging in Savli taluka )
हे देखील वाचा:
|ब्रह्मपुरी | गावातील युवकाचा अल्पवयीन युवतीवर अत्याचार
त्याचे कुटुंब मृत व्यक्तीच्या भरवशावर होते, मुली लग्नाच्या आहेत. तुरण शेतकरी हताश होऊन आत्महत्या सारखा टोकाची भूमिका घेतो म्हणजे त्याच्या मनावर किती मोठा आघात अशेल याचा प्रशासनांनी आणि शासनाने अशे प्रकरण गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांच्या वेळीच अडचणी दूर कराव्या अशी माहिती खुशाल लोडे यांनी केली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.