तीन मित्रांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू |
Maharashtra | श्रीगोंदा-काष्टी रोडवर हॉटेल अनन्याजवळ एक भीषण अपघात घडला आहे. आपल्या मित्राला सोडवायला निघालेल्या तीन तरुणांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. राहुल सुरेश आळेकर वय २२,केशव सायकर वय २२,आकाश रावसाहेब खेतमाळीस वय१८ अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. (Three friends die in horrific accident )
अपघात घडल्यानंतर हॉटेल अनन्याचे मालक महेश शेंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेत अपघातग्रस्त तरुणांना त्यांच्या वाहनातून बाहेर काढून रुग्णवाहिका बोलावली. यातील केशव व आकाश या दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला होता राहुलला उपचारासाठी श्रीगोंदयात नेले मात्र तोपर्यत त्याची प्राणज्योत मालवली होती.
हे देखील वाचा:
|ब्रह्मपुरीत ट्रकच्या अपघातात एक जण ठार
मिळालेल्या माहितीनुसार राहुल व आकाश हे केशव याला काष्टी येथे सोडवण्यासाठी मित्राची स्विफ्ट कार घेऊन निघाले होते त्यावेळी रात्रीच्यावेळी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटरच्या ट्रेलरला जोरदार धडक बसल्यामुळे हा भीषण अपघात झाला, त्यातच या मित्रांचा मृत्यू झाला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.