तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Bhandara Police Patil Recruitment: पोलीस पाटील भरतीतील अनियमिता प्रकरणी तीन अधिकारी निलंबित | Batmi Express

Bhandara Police Patil Recruitment,Bhandara,Bhandara Batmya,Bhandara Live,

Bhandara Police Patil Recruitment,Bhandara,Bhandara Batmya,Bhandara Live,

भंडारा : 
भंडारा उपविभागात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पोलिस पाटील पद भरतीत अनियमितता झाल्याच्या गंभीर तक्रारी करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी स्तरावर तपासाअंती प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार भंडाऱ्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे तथा पवनीच्या तत्कालीन तहसीलदार नीलिमा रंगारी यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. हा आदेश महसूल व वन विभाग खात्याने मंगळवारी निर्गमित केला.

माहितीनुसार, भंडाऱ्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे तसेच पवनीच्या तत्कालीन तहसीलदार नीलिमा रंगारी या पदावर असताना त्यांनी पोलिस पाटील भरतीत अनियमितता केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यात पोलिस पाटील भरतीची प्रक्रिया सुरू असताना पोलिस पाटलांच्या पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. त्या उमेदवारांनी दिलेल्या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध न करताच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व उमेदवारांना बोलावण्यात आले.

नियमानुसार परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करूनच एका जागेसाठी जे निकष लावले गेले असतील, त्यांनाच बोलवायला पाहिजे होते. परंतु तसे न करता सर्वच परीक्षार्थींना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. यावर तक्रारकर्ता शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. या शिष्टमंडळात अंकुश वंजारी, परमानंद मेश्राम, प्रमोद केसलकर, बालू ठवकर, डॉ. देवानंद नंदागवळी यांचा समावेश होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी प्राथमिक चौकशी केली असता, प्रथमदर्शनी तथ्य दिसून आले. तसेच २० जून २०२३ रोजी विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अन्वये अहवालही प्राप्त झाला. त्यामुळे मंगळवारी तत्कालीन एसडीएमसह दोन तहसीलदारांना शासन सेवेतून निलंबित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. तसेच यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीची कारवाई करण्याचेही आदेशात नमूद आहे.

दोन अधिकाऱ्यांचे झाले स्थानांतरण -

भंडाऱ्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी हे सध्या पालघर येथे रोहयो उपजिल्हाधिकारी म्हणून पदावर कार्यरत होते. तर पवनीच्या तत्कालीन तहसीलदार नीलिमा रंगारी यांची चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाडी येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली होती. तर अरविंद हिंगे हे भंडारा येथे तहसीलदार पदी कायम होते. पोलिस पाटील भरतीत या तिन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने प्रशासनिक गोटात एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.