मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. बोर्डाने फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर असणार आहे.
बारावी बोर्डासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर असणार आहे. बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे आवेदन पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
दहावी बोर्ड परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी आता 25 नोव्हेंबरपर्यंतची मुदत असेल याआधी ही मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत होती, ही मुदत आता वाढवण्यात आली आहे. तर बारावी बोर्डाच्या परीक्षेचे आवेदन पत्र विलंब शुल्कासह 30 नोव्हेंबर ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत.
दरम्यान, बारावी बोर्ड परीक्षेसाठी याआधीची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत होती. यामध्ये आता वाढ करण्यात आली असून बारावीच्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह परीक्षेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.