ब्रम्हपुरी: विजेच्या तारेचा स्पर्शाने चार शेतकऱ्यांचा मृत्यू | Batmi Express

Be
0

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Today,Bramhapuri Live,Electric Shock,Chandrapur Electric Shock,

ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपुर गावाच्या शेतशिवारात सदरची दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. जिल्ह्यात मागील दोन- तीन दिवसांपासून पाऊस सुरु होता. दरम्यान आज उघडीप असल्याने अनेक शेतकरी शेतात कामासाठी गेले होते. याच वेळी शेतात काम करीत असताना पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे व नानाजी राऊत या चार शेतकऱ्यांना तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिवंत विद्युत तारा शेतात पडून राहिल्यामुळे सदरची घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान घटनेची माहिती गावात समजताच गावकर्यांनी शेताकडे धाव घेतली. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->