![]() |
चिखलगाव शेतीचे नुकसान छायाचित्र -2023 पुर |
चंद्रपूर :- सततच्या पावसामुळे आणि गोसीखुर्द (Gosikhurd Dam) धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर (Wainganga River Flood) आला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार (Guardian Minister :- Sudhir Mungantiwar) यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.