ब्रम्हपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस, लाडज गावचा संपर्क तुटला; विद्यार्थ्यांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास | Batmi Express

Be
0

Chandrapur News,Chandrapur,Ladaj,Bramhapuri,Chandrapur Live,Bramhapuri Live,Bramhapuri News,

ब्रम्हपुरी
: राज्यातील काही जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊ पडत आहे. त्यातील एक जिल्हा म्हणजे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज गावाचा अन्य गावांशी आता संपर्क तुटला आहे. नदीला पूर असल्यानं विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत.
मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नदीला पूर असल्यानं विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. सध्या नाव बंद असल्याने पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. 

मात्र, प्रशासनाकडून अद्याप कुठलीही सुविधा किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.  या गावाच्या चारही बाजूने वैनगंगा नदीचा वेढा आहे. एकीकडे देशात सर्वत्र देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असताना मागील 75 वर्षापासून या गावाला जोडण्यासाठी नदीवर पुल बांधण्यात आलं नसल्यानं हे ग्रामस्थ या नदीतूनच जीवघेणा प्रवास करीत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. पावसाळ्यात तर या गावाचा अन्य गावांसह तालुका आणि जिल्ह्याची संपर्क तुटतो किं बहुना कुठल्या विशेष गरजा पूर्ण करायच्या असल्यास त्यांना छोट्या नावेतूनच दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातूनच प्रवास करुन पूर्ण कराव्या लागत आहेत. मागील २ वर्षांपूर्वी नावेतून प्रवास करताना एक नाव नदी पात्रात मधोमध पोहोचल्यानंतर अचानक नियंत्रण तुटल्याने नाव बुडाली  होती. या घटनेत काही बचावले तर काहींना आपलं प्राण गमवावं लागलं होत. 

चिखलगाव ते लाडज या मार्गवरील वैनगंगा नदीवर पुलाची निर्मिती करण्याचं आव्हान फक्त लोकप्रतिनिधी कडून करण्यात येत आहे. पण हे आव्हान फक्त निवडणूक पर्यंतच असत नंतर गावाचा विकास झालं कि नाही याकडे कुणाचेही लक्ष नाही आहे. कारण गावातील रस्त्यांचे हाल झाले बेहाल...  याविषयी बातमी एक्सप्रेसने सविस्तर वृतांत पब्लिश केलं आहे. 


बातमी एक्सप्रेसचे टीम कडून अनेक वृत्त पब्लिश करण्यात आलं आहेत. परंतु लाडज या गावाकडे प्रशासन दुलर्क्ष  करत असल्याचं चित्र आज पुन्हा दिसत आहे. कारण विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. अशावेळी प्रशासन ऍक्टिव नसेल तर नागरिकांना ऑनफिल्ड मोहीम सुरु करावी लागेल. 

वृतांत वाचा : 

आता पुन्हा एकदा ग्रामस्थांचा अन्य गावांशी संपर्क तुटलेला असतानाही प्रशासनानं त्यांना अद्याप कुठलीही सुविधा पुरवलेली नाही. गोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या 48 तासापासून गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले जाणार आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या कमी आहे. जर पाऊसाचा जोर कायमचा राहील तर विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती  समोर आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->