'
30 seconds remaining
Skip Ad >

चामोर्शी : चिचडोह बॅरेजमध्ये बुडून चार युवकांचा मृत्यू | Batmi Express

0

Chichdoh Barrage,Chichdoh-Barrage,Chamorshi,Chamorshi News,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli  Live News,Drowned,

चामोर्शी (Chamorshi) :
 हॉटेलात जेवण करुन पाच मित्र पोहण्यासाठी तलावात उतरले, यावेळी खोल पाण्यात एक मित्र बुडत असल्याचे पाहून चौघे धावले. बुडत असलेल्या मित्राला वाचवले, पण नंतर ते चौघेही बुडाले. १४ मे रोजी सर्वत्र मातृदिन साजरा होत असताना चामोर्शी शहरात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.

यामध्ये 

  • मोनू त्रिलोक शर्मा वय २६ रा. गडचिरोली
  • प्रफुल्ल विठ्ठल येलुरे वय २०
  • शुभम रुपचंद लांजेवार वय २४
  • महेश मधुकर धोंगडे वय २० 

सर्व रा. चामोर्शी अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा:- चामोर्शी: लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने १२ वर्षीय मुलीला चिरडले

रविवारी सुटीच्या निमित्ताने ते दुपारी एकत्रित आले. चामोर्शी शहराजवळील एका हॉटेलात त्यांनी जेवण केले. उन्हामुळे गरमी होऊ लागल्याने त्यांनी चिचडोह बंधाऱ्यात पाेहण्याचे ठरवले. त्यानुसार, पाचही जण पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हर्षल धोडरे हा बुडू लागला, त्याच्या मदतीसाठी इतर चौघेही धावले. त्यांनी हर्षलला वाचविले, पण त्यानंतर चौघेही बुडाले. बुडताना वाचल्याने हर्षलला धाप लागली होती. जवळ इतर कोणी नसल्याने त्यांच्या मदतीला मात्र कोणी धावू शकले नाही.


उपरोक्त चार जणांसह अन्य काही युवत्यु चिचडोह बॅरेजवर गेले होते. पाच जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चार जणांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने चौघांचाही बुडून मृत्यू झाला. एक जण कसाबसा बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला.

हेही वाचा:- वरातीची बस नाल्यात कोसळल्याने एकाचा मृत्यू तर २४ जण गंभीर जखमी

नातेवाईकांच्या आक्रोशाने गहिरवले शहर
या घटनेनंतर बंधाऱ्याजवळ नागरिकांनी तोबा गर्दी केली. चार तरुण मित्रांचे एका शेजारी मृतदेह ठेवले हाेते. हा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यानंतर चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीवेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांनाही गहिवरुन आले. संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर साठे, तुषार पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. परंतु नाव उपलब्ध नसल्याने पोलिसांनी पाण्यात उड्या मारल्या, तासभर शोधमोहीम राबविल्यानंतर पोलिसांनी काही युवकांच्या साह्याने दोरखंडाचा आधार घेत चार युवकांना बाहेर काढले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×