हवामान विभागाच्या दिलेल्या ताज्या माहिती नुसार, ‘नूरू’ या सुपर चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाले असून, त्यामुळे नैऋत्य माॅन्सून देशातून माघार घेण्यास विलंब होत आहे. या सुपर चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडू शकतो - असे पंजाबराव डख यांनी सांगितले .
राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासह कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग - तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
तर ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे पाऊस होतील, दिवाळीतही पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.