आरमोरी:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील तीन इसम आज सकाळी चामोर्शी रोडकडील जंगलामध्ये काळया तोडण्यासाठी गेले होते. काळया तोडत असताना अचानक जंगलामध्ये वाघाची डरकाळीचा आवाज ऐकू आल्याने ते घाबरून तिघेजण एका झाडावरती चढले. लगेच त्यांनी फोनवरून गावकऱ्यांना माहिती सांगितले तसेच ही माहिती वनविभागाला तात्काळ मिळताच वन विभागाचीी टीम घटनास्थळी दाखल झाली. ही वार्ता गावामध्ये पसरताच वैरागड येथील नागरिक सुद्धा लगेच घटनास्थळी धाव घेतली.
त्या नंतर वनविभागाच्या टीमने त्यांना झाडावरून सुखरूप खाली उतरून त्यांची सुटका करून त्या तिघांनी सुटकेचा श्वास घेतला अशी माहिती मिळालेली आहे.
त्यामूळे या जंगलामध्ये नागरिकांनी प्रवेश करू नये असे आवाहन वन विभागाच्या वतीने करून सहकार्य करावे असे वनविभागाने कळविले आहे.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.