ब्रम्हपुरी: तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव अ-हेरनवरगाव हे गांव असून त्यांचा मुख्य पीक भात पीक व सोयाबीन आहे. यावर्षी लागोपाठ एका आठवड्यात दुसऱ्यांदा या गावाला महापुराने वेढा घातलेला आहे. पुरामुळे गावातील जनतेचे जीवनमान विस्कळीत झालेले आहे. मोठ्या प्रमाणावर भात पिकांची नुकसान झालेली आहे. त्याचप्रमाणे अन्य पूरक पिके देखील उद्ध्वस्त झालेली आहेत. वारंवार बाह्य संपर्क तुटत असल्यामुळे गावातील जनतेला गावाबाहेरची कामे करायला अडचण निर्माण झालेली आहे. शासकीय कर्मचारी गावात येऊ शकत नाही. त्यामुळे अ-हेरनवरगाव हे गाव मुख्य प्रवाहापासून दूर जात आहे. अ-हेरनवरगाव ला दरवर्षी पूराचा फटका सहन करावा लागत असतो.
अ-हेरनवरगाव या पूरग्रस्त गावाला विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावा. अशी अ-हेरनवरगाव ग्रामसस्थानची मागणी
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.