दरम्यान, कोणताही आदेश हा दिल्लीतून आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर पडली. याची कल्पना कोणालाच नव्हती. कदाचित शिंदेंना सुजाण नसावी. या कार्यपद्धतीमध्ये आदेश एकदा दिल्यानंतर तो आदेश पाळावा लागतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, असं शरद पवार म्हणत फडणवीसांना टोला लगावला आहे. तसेच पवारांनी या दोघांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

मागील दहा दिवसांपासून बंडखोर आमदार राज्याच्या बाहरे होते. आसाममध्ये जे आमदार गेले त्यांची नेतृत्व बदलण्याची मागणी होती. पण भारतीय जनता पार्टीमध्ये आदेश एकदा आल्यानंतर तंतोतंत पाळावा लागतो याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तसेच पवारांनी या दोघांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.