बबन मारोती सुरपाम (वय ४५) रा. राजुरवाडी, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही वर्षापासून शेतात नापिकीमुळे त्यांचा संसार मोडकळीस आला होता. त्यात मुलीचे लग्न असल्यामुळे बबनराव नेहमी चिंताग्रस्त असायचे, या कारणांमुळे बबन यांनी स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. मृत बबन यांच्याकडे कोरडवाहू तीन एकर शेती आहे. त्यांच्या आत्महत्यामुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सोनुले यांच्या नेतृत्वाखाली जमादार संजय जाधव करीत आहे.