चंद्रपुर: आगीत 30 क्विंटल कापूस जळून खाक; दोन शेळ्यांना गमवावा लागला जीव

Be
0

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News LiveChandrapur Today,Jivati,

जिवती
तालुक्यातील हिमायतनगर येथे सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली आहे. या आगीत 30 क्विंटल कापूस जळून खाक झाला. दोन शेळ्यांनाही आगीत जीव गमवावा लागला. आगीने घरातील इतर वस्तूही खाक झाल्या आहेत. अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

(ads1)

प्राप्त माहितीनुसार जिवती तालुक्यातील हिमायतनगर येथील दगडू आनंदा कासार यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. पाहता-पाहता आगीचा भडका वाढला. या आगीत घरात ठेवलेला 30 क्विंटल कापूस जळून खाक झाला. आगीत दोन शेळ्यांनाही जीव गमवावा लागला.

घरातील संसार उपयोगी साहित्य जळाले. आगीची माहिती मिळताच गावकरी धावून गेले. या आगीत अंदाजे तीन लाखांचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->