![]() |
जायकवाडीचे धरणाचे 18 दरवाजे उघडले |
औरंगाबाद : राज्यात मुसळधार पावसामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अति बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज जायकवाडी धरणाचे 18 रेडिअल गेट्स टप्प्याटप्प्याने अर्धा फुट उघडून एकूण 9432 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. ही आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कतेचे इशारा देण्यात आले आहे. ( 18 gates of Jayakwadi dam opened, alert to people along Godavari river )
जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे टप्प्याटप्प्याने अर्धा फुट उघडून एकुण 9432 क्यूसेस विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येत आहेत. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावधनता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गोदावरी, दिंडोरी निफाड तालुक्यातल्या सर्व कादवा नदीकाठच्या गावक-यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.