जायकवाडीचे धरणाचे 18 दरवाजे उघडले, गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा - BatmiExpress.com

rain, Jayakwadi Dam, heavy rains lash, maharashtra, aurangabad, nashik, nashik rain,Marathi News, News,Latest News in Marathi,

rain, Jayakwadi Dam, heavy rains lash, maharashtra, aurangabad, nashik, nashik rain,Marathi News, News,Latest News in Marathi,
जायकवाडीचे धरणाचे 18 दरवाजे उघडले

औरंगाबाद :
 राज्यात मुसळधार पावसामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अति बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज जायकवाडी धरणाचे 18 रेडिअल गेट्स टप्प्याटप्प्याने अर्धा फुट उघडून एकूण 9432 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. ही आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कतेचे इशारा देण्यात आले आहे.  ( 18 gates of Jayakwadi dam opened, alert to people along Godavari river )

कालपासून जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे तसेच सध्यस्थीतीतदेखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंत एकूण 92.31 टक्के जलसाठा झाला आहे आणि अजून त्यामध्ये भर पडत आहे. प्रकल्पात 100 टक्के जलसाठा झाल्याने आज 18 दरवाजे उघड्ण्यात येत आहेत. जायकवाडी प्रकल्पाच्या खालील गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, गुरेढोरे, विदुयत साहित्य, वैगरे असल्यास लागलीच काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हेही वाचा:  गोसीखुर्द: 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय : ना. विजय वडेट्टीवार

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे टप्प्याटप्प्याने अर्धा फुट उघडून एकुण 9432 क्यूसेस विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येत आहेत. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी  सावधनता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गोदावरी, दिंडोरी निफाड तालुक्यातल्या सर्व कादवा नदीकाठच्या गावक-यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.