काल कुलगुरूंची बैठक पार पडली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे. मात्र अजूनही कॉलेज सुरु झालं नाही आणि त्यामुळे कॉलेज सुरु कधी करायचं यावर विचार सुरुच आहे. प्रत्येक विभागातील कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोना स्थितीचा आढावा लक्षात घेऊन कॉलेज सुरु करण्यास सांगण्यात आलं आहे. (College Reopen )
संपूर्ण स्थितीचा आढावा १५ दिवसात प्राप्त होईल. त्यामुळे १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत.
दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाची वेगवेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू (College Reopen ) होताना निकष वेगवेगळे असण्याची शक्यता आहे.