परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी पिकविमा संदर्भात आवाहन - फोटो फाईल: मा. जिल्हाधिकार्यांचे प्रोफाईल
परभणी:- प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यास सुरुवात केली असून पिक विमा भरण्याची अंतिम मुदत दि.15 जुलै 2021 ही आहे. रविवार दि.11 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा पिक विमा काढलेला असून त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा संबंधितांनी गुगल प्ले स्टोअरवरुन ‘क्रॉप इन्शुरन्स’ हे ॲप डाऊनलोड करावे व त्यामध्ये पिक विमा संरक्षण घेतलेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती स्थानिक आपत्तीअंतर्गत नुकसानग्रस्त फोटोसह अपलोड करावी किंवा 18001024088 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.
हेही वाचा: धक्कादायक! गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू