तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, गोसीखुर्दमधून 4113 क्युसेक पाण्याचा विसर्ग, क्युसेक मध्ये वाढ होण्याची शक्यता | बातमी एक्सप्रेस

गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले,33 doors of gosikhurd dam open due to heavy rain,gosikhurd dam,Bhandara,Goshikhurd,Goshikhurd live,Goshikhurd news,

गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले,33 doors of gosikhurd dam open due to heavy rain,gosikhurd dam,Bhandara,Goshikhurd,Goshikhurd live,Goshikhurd news,
गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले

भंडारा:- मागील तीन दिवसापासून राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच गोसीखुर्द धरणाच्या (gosikhurd dam)  पाणलोट क्षेत्रातही सतत पाऊस सुरू असल्याने धरणाचे 33 पैकी 30 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत, तर उरलेली 3 दरवाजे 1 मिटरने उघडले आहेत. गोसीखुर्द धरणातुन सध्या 4113 क्युमेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (33 doors of gosikhurd dam open due to heavy rain

राज्यातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत तुरळकच पाऊस सुरू आहे. मात्र मध्यप्रदेशात पाऊस जास्त असल्यामुळे आजची स्थिती उद्भवली. भंडारा जिल्ह्यातील गावांना तसा धोका काही नाही. 

कारण असं आहे की, गोसीखुर्दपासून वर्धापर्यंत वैनगंगेची वहन क्षमता 9000 क्युसीक्स म्हणजे 3 लाख 17 हजार क्युसीक्स आहे. आणि गोसीखुर्द मधून सध्या 2000 क्युमेक्स येवढीच पाण्याची पातळी आहे. पण मासेमारांनी नदीमध्ये जाताना सतर्कता बाळगण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे. भंडारा जिल्हा अजूनही काही प्रमाणात पाणी पचवू शकतो. कारण यावर्षी पावसाळ्यात आत्तापर्यंत पाऊसच न झाल्यामुळे पाणी जमिनीत जिरत आहे.

गोसीखुर्द धरणाचे आज सकाळी 6 वाजता 3 दरवाजे, 8 वाजता 7 आणि 10 वाजता 12 दरवाजे, त्यानंतर उर्वरित दरवाजे उघडण्यात आले आहे. असे एकूण गोसीखुर्द धरणाचे आज 33 दरवाजे आत्तापर्यंत उघडण्यात आले आहेत. आज सकाळपासून तिसऱ्यांदा स्थिती बदलली गेली आहे. या पावसाळ्यात दुसऱ्यांदा ही स्थिती आली असल्याचे गोसीखुर्द प्रशासनाने अशी माहिती दिली आहे. आजही पूर्व आणि पश्‍चिम विदर्भात अति तीव्र पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे गोसीखुर्दचे आणखी काही दरवाजे उघडले जातील, अशी शक्यता वर्तविली गेली आहे.

नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पण 9 हजार क्युमेक्सच्या वर जर पातळी गेली तरच 154 गावांना इशारा दिला जातो आणि यांपैकी 130 गावांना जास्त धोका आहे. चंद्रपूरचा जिल्ह्यातील पावसाचा परिणाम गोसीखुर्दवर होत नाही. पण गोसीखुर्द ओव्हरफ्लो झाला तर गडचिरोली जिल्ह्याला धोका संभवतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 101 टक्के पाऊस झाला. भंडारा आणि गोंदियाचा विचार केल्यास अजूनही पावसाची गरज आहे. आत्तापर्यंत गोंदिया २२ टक्के, तर भंडारा जिल्ह्यात 21 टक्के रोवण्या झाल्या आहेत. सध्या सुरू असलेला पाऊस शेतींसाठी फायद्याचा ठरणार आहे. आज प्रकल्पाचे उघडण्यात आलेले दरवाजे नागपूरच्या पावसामुळे उघडण्यात आले आहेत. मध्यप्रदेशच्या संजय सरोवराने कन्हान पाणी सोडल्यास आणखी काही दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.