तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli Naxal: छत्तीसगड चकमकीत गडचिरोलीतील चार नक्षल कमांडर ठार | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Naxal,Gadchiroli News,Gadchiroli Today,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,

Gadchiroli,Gadchiroli Naxal,Gadchiroli News,Gadchiroli Today,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,

गडचिरोली:- 
तीन दिवसांपूर्वी ३० एप्रिलला छत्तीसगडमधील नारायपूर जिल्ह्यातील अबुझमाड जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले. यात गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत वरिष्ठ नक्षल नेता जोगन्ना आणि पत्नी संगीता आत्राम यांच्यासह कंपनी क्रमांक १० चा कमांडर मल्लेश आणि सहकमांडकर विनय यांचाही समावेश आहे.


नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड परिसरातील टेकामेटा गावाजवळच्या जंगलात अबुझमाड डिव्हीजन आणि उत्तर गडचिरोली डिव्हीजनच्या वरिष्ठ नक्षलवाद्यांचे शिबिर सुरु असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छत्तीसगड पोलिस घटनास्थळी पोहचताच ३० एप्रिलला पहाटे पोलिस आणि नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. ही चकमक तब्बल १६ तास चालली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता ७ पुरुष आणि ३ महिला नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. शिवाय १ एके-४७, १ इंसास, दोन ३०३ रायफल, एक ३१५ रायफल, एक १२ बोर बंदूक, चार भरमार बंदुका, स्फोटके, पुस्तके, संगणक आणि अन्य साहित्यही आढळून आले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले.


मृत नक्षल्यांमध्ये एक स्पेशल झोनल कमिटी मेंबर, एक डीव्हीसीएम आणि एक एसीएमचा समावेश आहे. यासंदर्भात गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, यातील स्पेशल झोनल कमिटी मेंबर जोगन्नावर १९६ गुन्हे दाखल आहेत. मुळचा तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्यातील जय्याराम येथील रहिवासी असलेला जोगन्ना हा नक्षल दलममधील वरिष्ठ नक्षल होता. ६६ वर्षीय जोगन्नाने त्याची बरीच कारकिर्द गडचिरोली जिल्ह्यात घालवली आहे. महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

कमांडर मल्लेशवर ४३ गुन्ह्यांची नोंद आहे. ४१ वर्षीय मल्लेश हा छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील रहिवासी होता. नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक १० चा तो कमांडर आणि विभागीय समिती सदस्य होता. त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने ८ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तो गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होता. ५५ वर्षीय विनय उर्फ रवी हा तेलंगणा राज्यातील चेन्नूर तालुक्यातील रहिवासी होता. तोसुद्धा विभागीय समिती सदस्य होता. विनयवर ८ गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावरही महाराष्ट्र सरकारने ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

जोगन्नाची पत्नी संगीता दोगे आत्राम ही अहेरी तालुक्यातील रामय्यापेठा येथील रहिवासी होती. कसनसूर दलम आणि अन्य दलममध्ये तिने काम केले होते. डॉक्टर आणि प्रेस टीम लीडर म्हणून ती कार्यरत होती. सहायक कमांडर असलेल्या संगीतावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते.
ठार झालेल्या जोगन्नाने गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीत ३५ वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. जोगन्नाची प्रचंड दहशत होती. ३० मे २०१० रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या तत्कालिन सभापती प्रीती गोडशेलवार यांचे पती श्रीनिवास गोडशेलवार यांच्यासह पोलिस भरतीसाठी गेलेला मनोज कांदो आणि अन्य दोघांचे नक्षल्यांनी अपहरण केले होते. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करुन अपहरण केलेल्याची सुटका केली होती. हे अपहरण जोगन्नाच्या नेतृत्वात झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.