पुणे : राज्यात मंगळवारपासून (दि. 21) बारावी बोर्डाची (HSC Exam) परीक्षा सुरु झाली आहे. कोविडनंतर यंदा प्रथमच १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होत आहे. राज्यातील 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून राज्यात जवळपास साडेचौदा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी (English Paper) विषयात गंभीर चूक (Mistake) समोर आली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 03 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी थेट उत्तर छापण्यात आल्याने बोर्डाच्या कामाची गंभीर चूक समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) आणि सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी संयुक्त सभेच्या अहवालानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना त्रुटी दूर करून योग्य न्याय दिला जाईल, असे म्हटले आहे.
इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 03 च्या
- A3 - मध्ये पेपर तपासण्याराला सूचना. (2M)
- A4 - प्रश्नाऐवजी थेट उत्तर (2M)
- A5 - प्रश्नाऐवजी थेट उत्तर (2M)
विद्यार्थ्यांना संभ्रम - प्रश्नाचं उत्तर काय लिहाच ?
केंद्रांना सूचना - तर अशा प्रकारे बोर्डाकडून तीन प्रश्नाच्या चुका झाल्या आहेत. तीनही प्रश्नाच्या चुका बोर्डानं निदर्शनास आल्या अससील तर इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 03 च्या A3 to A5 चे 6 मार्क विद्यार्थ्यांना बोनस मिळतील.
मात्र या बद्दल लवकरच बोर्ड निर्णय घेणार आहे. तर अशा प्रकारे पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये काहीसा गोंधळ झाला. याचा विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का ? विद्यार्थ्यांना 6 मार्क बोनस मिळणार का ?