आरमोरी: प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील रामाळा येथील वाघाच्या हल्ल्यात आनंदराव पांडुरंग दूधबळे (वय 55 वर्ष) ठार झाल्याची घटना आज अंदाजे सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्तात असं की, धान्य कापणीच्या कामाला वेग आलेला असल्याने धानाच्या कडपा जमा करण्यासाठी शिधीची गरज पडते त्याकरिता रामाळा (आरमोरी) येथील आनंदराव दुधबळे हे आपल्या सहकाऱ्यासोबत सकाळी 8 वाजता वैरागड रोडवर कूप क्र.41 त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा मोठा आप्त परिवार आहे.
या घटनेची माहिती गावातील नागरिकांना मिळाली असता घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. परंतु वरील घटनेमुळे रामाला परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना धानाची कापणी, मळणी कशी करावी हा असा प्रश्न आता शेतकऱ्या समोर उपस्थित झाला आहे.
तसेच या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली असता आरमोरी रेंज वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी असल्याची माहिती मिळालेली आहे. प्रेत PM साठी नेेण्यात आले आहे. त्यामुळे या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी रामाला परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.