शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी काल राजीनामा राज्यपाल यांच्याकडे दिल. आजच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधन करत मोठा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं त्यांनी म्हटलं. कालपर्यंत उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री झाले आहेत. यामुळे आता भाजपने सरकार स्थापनेची कसरत जोरात सुरू केली आहे. सकाळी 11 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या घरी कोअर ग्रुपची बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सी.टी.रवी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. 1 किंवा 2 जुलैला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, असे मानले जात आहे.
बुधवारी रात्री उशिरा हॉटेल ताजमध्ये आमदारांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बाहेर येत असताना त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर हसू तर मनात आनंदाची लाट स्पस्ट दिसत होती. मात्र, मंगळवारी फडणवीस दिल्लीत आले असता सरकार स्थापनेची संपूर्ण रणनीती आखण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र उद्धव यांनी संपूर्ण मैदान रिकामे केल्याने आता फडणवीसांचा मार्ग सुकर झाला आहे
चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली,
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी रात्री पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हेच आता पुढील रणनीती ठरवतील. विजयी होताना भाजप कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची घोषणा होताच भाजपच्या गोटात जल्लोष सुरू झाला. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी देवेंद्र फणवीस यांच्या घरी जमून विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. फडणवीस लवकरच राज्याची सूत्रे हाती घेतील, असे यातील अनेक नेत्यांनी सांगितले. अखेर सत्याचा विजय होतो, असे माजी मंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले, फडणवीस नेहमी सभागृहात परतणार असल्याचे सांगत. आताच हि वेळ आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परत येतील.” महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांना मिठाई खाऊ घातली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन यावेळेस उपस्थित होते.