'
30 seconds remaining
Skip Ad >

"जगावे किंवा मरावे" : चंद्रपुरातील या गावात पिण्याच्या पाण्यासाठी १ किलोमीटर अंतराचा प्रवास - Be Chandrapur

0

Chandrapur,Chandrapur Live,Jivati,Chandrapur Today,Chandrapur News,Chandrapur News Live,

रामटेक गुडा  गावांमध्ये सामान्य जनतेला पिण्याचे पाणी आणण्यासाठी दररोज ०१ किलोमीटर अंतरावर जाऊन डोक्यावर पाणी आणावे लागते, व गुरा-ढोरांना सुद्धा पाणी डोक्यावर आणून पाजावे लागते.

जिवती:- असापुर ग्रामपंचायत मधील रामटेक गुडा गड पांढरवणी हे गाव २२ वर्षांपासून वसलेला आहे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव वास्तव्यास आहे तरी या गावांमध्ये लोकप्रतिनिधीनी आणि प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे. 

कारण या गावांमध्ये सामान्य जनतेला पिण्याचे पाणी आणण्यासाठी दररोज ०१ किलोमीटर अंतरावर जाऊन डोक्यावर पाणी आणावे लागते, व गुरा-ढोरांना सुद्धा पाणी डोक्यावर आणून पाजावे लागते, या संबंधी समस्येचे निराकरण व्हावे म्हणून समस्त गावकरी मंडळी अनेकदा गट विकास अधिकारी यांना भेट देऊन आपल्या गावाची समस्या सांगितली तरी आतापर्यंत गट विकास अधिकारी यांनी रामटेक गुडा येथील पाण्याची समस्या सोडविली नाही.

याकरिता आदिवासी बांधव "जगावे किंवा मरावे" असा प्रश्न जर गावातील जनतेला पडत आहे तर या समस्येचे तात्काळ निवारण करावे अन्यथा गावातील मंडळी व जय विदर्भ पार्टी आमरण उपोषणाला बसेल असे सुदामभाऊ राठोड यांनी सांगितले. येत्या सात दिवसात प्रशासनांनी टँकरची सोय करून देण्यात यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×