भंडारा : मुख्यमंत्री साहेब, शेतीतून उत्पन्न होत नाही. सतत नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. शासन नुकसानभरपाई देत नाही. धानाला बोनसही मिळाला नाही. आर्थिक चटके सोसावे लागतात. अशा परिस्थितीत किराणा दुकानदारांना दिलेल्या परवानगीप्रमाणेच आम्हालाही वाईन विक्रीची परवानगी द्या, अशी अजब मागणी भंडारा जिल्ह्यातील नीलज बुज येथील शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे. या मागणीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
- जयगुनाथ गाढवे, शेतकरी, नीलज बु., जि. भंडारा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.