तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गोसीखुर्द धरणाचे 23 दरवाजे उघडले, गोसीखुर्दमधून 2540 क्युसेक पाण्याचा विसर्ग | बातमी एक्सप्रेस

गोसीखुर्द धरणाचे 23 दरवाजे उघडले,23doors of gosikhurd dam open due to heavy rain,gosikhurd dam,Bhandara,Goshikhurd,Goshikhurd live,Goshikhurd news,
गोसीखुर्द धरणाचे 23 दरवाजे उघडले,23doors of gosikhurd dam open due to heavy rain,gosikhurd dam,Bhandara,Goshikhurd,Goshikhurd live,Goshikhurd news,
गोसीखुर्द धरणाचे 23 दरवाजे उघडले
भंडारा:- पावसाच्या दिर्घ विश्रांतीनंतर दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. गोसेधरणाच्या  (gosikhurd dam)  पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वैनगंगा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने धरणाची पातळी कायम ठेवण्यासाठी गोसेधरणाचे 23 गेट अर्धा मिटरने उघडण्यात आले आहे. धरणामधून 2540 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत असून दर तासी 160 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 449 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. 2-3 दिवसांपासून दमदार व समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकरी सुखावला आहे. नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.  (23 doors of gosikhurd dam open due to heavy rain

पावसाळा अर्धा होऊन देखील जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला होता. पावसाने दडी मारल्यामुळे धान पिकासह अन्य पिके करपू लागले होते. रोवणी झालेल्या शेतजमिनीला मेगा पडल्या होत्या. झालेला खर्च वाया जाणार की काय अशी शंका शेतकरी वर्तवित होता. धान पिक वाचविण्यासाठी धडपड करीत होता. अशातच दिर्घ विश्रांतीनंतर दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची संततधार सुरुच होती. यामुळे धान पिकासह अन्य पिकांना नवसजिवनी मिळाली असून शेतकरी सुखावला आहे. संततधार पावसामुळे तलाव व प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. नदी नाल्यांना पूर येऊन ओसंडून वाहत आहेत. 

वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गोसेधरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली. पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी आज गोसेधरणाचे 23 दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात आले. धरणातून 2540 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होऊन दर तासाला 160 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.