![]() |
Gadchiroli: जिल्ह्यातील नद्यांची पातळी सामान्य - Img by - TOI |
Gadchiroli: जिल्ह्यात व शेजारील जिल्ह्यात कुठेही अतिवष्टी झाली नसल्याने जिल्ह्यातील नद्यांची पातळी सामान्य असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कळविले आहे.
वैनगंगा नदीवर असलेल्या गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी ३३ गेट बंद असुन पॉवर हाऊस मधून १६० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वैनगंगा नदीची पाणी पातळी पवनी, देसाईगंज, बाघोली का आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.
वर्धा नदीवरील निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ पैकी ३ गेट ५ से.मी. सुरु असुन १४.४० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वर्धा नदीची पाणी पातळी बामणी (बल्हारशा व सिरपूर सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असून इशारा पातळीच्या खाली आहे.
प्राणहिता नदीची पाणी पातळी महागांव व टेकरा सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन शारा पातळीच्या खाली आहे.
गोदावरी नदीवरील मेडीगड्डा बॅरेज चे ८५ पैकी ८५ गेट बंद असून गेटव्दारे विसर्ग निरंक आहे. गोदावरी नदीची पाणीपातळी कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.
इंद्रावती नदीची पाणी पातळी जगदलपूर, चिंदनार व पाबागुडम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असून इशारा पातळीच्या खाली आहे.
पर्लकोटा नदीची पाणी पातळी मामरागड केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली असल्याचे कळविण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.