Education News: राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन व विद्यार्थांचे आरोग्याकडे बघता इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र दहावीची परीक्षा रद्द करताना अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सामायिक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याची घोषणा करण्यात आली होती.
त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली कि, दहावीचा निकाल जुलै महिन्यात घोषित करण्यात येईल आणि अकरावीच्या प्रवेशासाठी CET परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती.
आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून १०वि नंतर अकरावी प्रवेशाच्या CET परीक्षेबाबतची महत्वाची माहिती देण्यात आली आहे.
जुलै महिन्याच्या शेवट किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. म्हणजे जे जे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ इच्छित नाही, त्यांना परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर अकरावीत प्रवेश मिळणार आहे. त्यांचं मूल्यमापन हे दहावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे.