तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Maharastra Lockdown Again: संपूर्ण नवीन नियमावली ! राज्यात आजपासून काय सुरु , काय बंद | Batmi Express Marathi

Maharastra Lockdown Again: शाळा, महाविद्यालयं तसेच सर्व प्रकारचे खाजगी क्लासेस बंद राहतील - सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे सुद्धा बंदच राहतील

Maharastra Lockdown Again,#MaharastraLockdownAgain,Maharastra News,Maharastra Lockdown NewsMaharastra Lockdown Again,#MaharastraLockdownAgain,Maharastra News,Maharastra Lockdown News

Maharastra Lockdown Again: : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 8.30 वाजता सोशल मीडियावरुन महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं.  राज्यात आज 14 एप्रिलच्या रात्री 8.00 वाजेपासून  - ते पुढील 15 दिवसांपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे - काल मुख्यमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली होती - 

  पहा कशी आहे नियमावली ?

● महाराष्ट्रात 14 एप्रिल रात्री 8 वाजेपासून राज्यात कलम 144 लागू होणार - सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार ,तसेच लोकल ट्रेन आणि बस सेवा सुरू राहणार.

● रिक्षात-ड्रायव्हर आणि 2 प्रवासी , तसे टॅक्सी मध्ये ड्रायव्हर आणि 50 टक्के क्षमतेने वाहतूक होणार - मात्र खासगी वाहतूक केवळ आणीबाणीच्या काळात सेवा देऊ शकतात.

● राज्यातील रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्स सेवा बंद असतील, त्यांना केवळ घरपोच पार्सल सेवा देण्याची मुभा असेल - तर ही सेवा सकाळी ७ ते संध्याकाळी ८ या वेळेत मिळणार.

● तसेच रस्त्यालगतचे सर्व खाद्यपदार्थांची दुकाने बंद राहतील. - पाणीपुरवठा, शेतीचे कामे करण्यास मुभा देण्यात आली आहे -  इलेक्ट्रिक वस्तू, गॅस पुरवठा, एटीएम सेवा ,बँकिंग सेवा सुरु राहील .

● राज्यात मेडिकल, किराणा दुकाने सुरू राहणार - मात्र असे दुकाने , मॉल, शॉपिंग सेंटर्स जे अत्यावश्यक सुविधांमध्ये मोडत नाहीत - ते बंद राहतील.

● धान्याची दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, दूध, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारचे खाद्यपदार्थांची दुकाने सुरू राहतील - मात्र राज्यातील ब्युटी पार्लर्स , सलून सिनेमागृह , बगीचे आणि व्यायामशाळा बंद राहतील.

● तसेच राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं तसेच सर्व प्रकारचे खाजगी क्लासेस बंद राहतील - सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे सुद्धा बंदच राहतील -औद्याेगिक क्षेत्रातील उद्याेग धंदे सुरू राहतील.

● तसेच जिथे कामगार राहत असतील केवळ ,अशाच ठिकाणची बांधकामे सुरू राहतील - राज्यात लग्नाला आता केवळ 25 जणांना तर अंत्यविधीला केवळ 20 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल.

● दरम्यान राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेमध्ये बदल करून - आणखी काही घटकांचा समावेश केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.