![]() |
नवी गृहमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. |
Mumbai Live: मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार झाले आहे. त्यामुळे नवी गृहमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. तर जलसंपदा मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. खुद्द दिलीप वळसे पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
$ads={1}
दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेलं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार यांनी केला.
$ads={2}
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.