तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली | Batmi Express Marathi

Maharashtra Board Exams 2021: परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. वर्षा गायकवाड

Maharashtra Board Exams 2021"Education News,Maharashtra HSC Hall tickets,Maharashtra HSC Class Exams 2021,Maharashtra Higher Secondary Certificate exam,Maharashtra board exams 2021,education news,divisional board"

Maharashtra Board Exams 2021:  
संपूर्ण राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. Read Also:  नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सुद्धा सरसकट उत्तीर्ण

$ads={1}

पहा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री ?

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले , राज्यातील 10 वीची परीक्षा जून महिन्यात होईल  - तर 12 वीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी घेतली जाईल तर परीक्षांबाबतचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे  - असे त्यांनी आज सांगितले.  Read Also:  राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी

तसे दहावी बारावीच्या - परीक्षाबाबत आणखी काही अपडेट आले,  तर ते आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू  - दरम्यान आज १२ एप्रिल ला झालेल्या निर्णयानुसार ,राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हेलकावे खात असलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसमोरील चित्र स्पष्ट झाले आहे. काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. 
$ads={2}
Maharashtra Board Exams: यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बराच खल झाला. सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. 

अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.