त्यामुळे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण होत आहे. याची चाहूल आता मार्च महिन्यातच लागली आहे, त्यामुळे महिलांना पाण्याची खूप मेहनत करावी लागत आहे.
ही समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न करून गावातील नळ योजना सुरू करावी व घरोघरी जोडणी करून द्यावे पाण्याच्या दोन टाके असून त्या शोभेच्या वस्तू असल्याचे दिसून येते त्याचा काहीही उपयोग नाही.
केंद्र सरकारच्या जलशक्ति मिशन अंतर्गत सर्व गावांना नळाद्वारे पाण्याची सोय करण्याची योजना आखली जात आहे त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
याकरिता बिकट होणारी पाणी समस्या सोडवण्यासाठी प्रेरणा ग्रामसंघ अध्यक्षा ममता भुजाडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला नवीन नळ योजना सुरू करून घरोघरी पाण्याची व्यवस्था करण्याबाबतच्या पत्र दिला आहे.